Skip to main content

Posts

Showing posts from June 27, 2011

तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही.

रणरणत्या उन्हाच, कधी पावसाच तुंबलेल्या पाण्यात काम कधी केल नाही ... भुकेल्या पोटी , बिन चहाच काम कधी जमलच नाही.. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. रोजच्या प्रवासात कार तर कधी ५० हजाराची बाईक, रस्त्यांनी हातगाडी आणि सायकली सुद्धा पाहिल्या नाहीत .. त्यांच्या पेक्षा सुखी म्हणून स्वतःचा मान सुद्धा मी ठेवला नाही. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. पाच आकडी पगार आणि बँकेत पाच-पाच अकाउंट पण पाच रुपयाचा साधा वडापाव भुकेल्याला दिला नाही. ए.सी.मध्ये बसून हॉलिडे प्लानिंग खूप केले, पण ऐन थंडीत काच उघडून कधी धुक्याला साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. बावीस कोटी जॉबलेस अशा धगधगत्या सत्यात महागाईचा 'म' सुद्धा मला शिवला नाही. जवळ असलेले प्रेम कधी वाटले नाही , कि कोणाचे हसू पाहवले नाही. तरी मी म्हणतो- माझा जॉब मला आवडत नाही. ज्याने हे सर्व दिले, त्याचे रोज आभार सुद्धा साधे मानत नाही . घराच्या माऊलीची छाया असून गर्व कमी होत नाही. एकामागून एक शिडी पार करताना मन कुठे धावत होते हेच उमगले नाही. स्वतः बरोबर,मुलाचा साधा आवडता छंद ...

मला समजून घ्या रे !..

या दुनियेत काही माणसं अशी असतात की, जी चेहे-यावर आपल्या मनातल्या भावना उतरवू शकत नाही.. त्यांनाही आनंद होतो, दु:ख होत, पण ते दाखवता येत नाही.. अश्या माणसांना आपण नेहेमी एक विशिष्ट शब्द वापरतो, 'मख्ख चेहे-याने बसलाय' जरा आनंद/दु:ख जाणवू देत की चेहे-यावर'  मात्र अशा माणसांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा... चेहरा माझा सदैव कोरा, कुणालाही समजत नाही मनामधल्या भावना या समोरच्याला उमजत नाही कशी होईल यातून सुटका.? काहीतरी सांगा रे माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !.. मनात खूप असते माझ्या, चेह-यावरून कळत नाही माझ्या भावना मणाकडून चेह-याकडे वळत नाहीत चेह-यावरून कळत नसेल तर आडाखे तरी बांधा रे माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !.. चेहरा बोलका असतो खरा, मी मात्र अपवाद आहे का माझ्या भावनांचा चेह-याबरोबर वाद आहे.? माझाच चेहरा का असा.? त्याला काही शिकवा रे माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !.. कधी माझ्या चेह-यावरची माशीसुद्धा हलत नाही भावनांचे व्यक्त होणे बहुदा त्याला चालत नाही काहीही असो, तुम्हीच त्याला हात धरून चालवा रे माझे म्हणणे ए...

;भारतामधील लोक गरीब आहेत पण भारत गरीबदेश नाही आहे

मित्रानो लक्षपूर्वक वाचा ,,,,,!!!! "भारतामधील लोक गरीब आहेत पण भारत गरीब देश नाही आहे" हे सांगितले आहे एका स्विस बँकच्या डारेक्टरने. तो म्हणतो कि "२८० लाख कोटी" भारतीय पैसा स्विस बँक मध्ये जमा आहे. ज्याचा वापर करून ३० वर्ष करमुक्त बजेट भारताला बनवता येईल. ६० कोटी लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपयोग करता येईल. कुठलेही गाव चोपद्री रस्ता करून दिल्लीशी जोडता येईल. ५०० सामाजिक कार्यक्रमाना फुकट वीज देता येईल तेही अनियमित काळासाठी. प्रत्येक नागरिकाला महिन्याला २००० रुपये असे जवळपास ६० वर्ष देता येतील. कुठलेही विदेशी कर्ज घेण्याची गरज भासणार नाही. अश्या प्रकारे आपला पैसा या "श्रीमंत राजकारण्यांनी" दाबून ठेवला आहे. आपल्या पूर्ण हक्क आहे अश्या भष्ट्र राजकारणी लोका विरुद्ध आवाज उठवण्याचा. . . . या संदेशाला इतक्या लोकापर्यंत पोहचावा कि प्रत्येक भारतीय हा संदेश वाचेल. गंभीरपणे यांचा विचार करा. तुम्ही विनोद पाठवू शकता तर हा संदेश का नाही? जबाबदार नागरिक बना.....

घरापासून दूर .........

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला तरी मला आई थोपटल्याशिवाय कधीच झोपली नाही घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित   शांत झोप कधी लागलीच नाही... कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"? कसा सांगू त्यांना घरातून निघताना आईला मारलेली मीठी सोडवत नाही... आई तू सांगायची गरज नाही   तुला माझी आठवण येते आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो   तरीही तू सहा वाजताच उठते तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली   तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला   आजही जीभ  आसुसली घरापासून दूर ....... आई जग खुप वेगले आहे   तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो   आता रानागानत उन  आहे तू आपल्या पील्लानसाठी   सगळ केलस एक दिवस पिल्लं म्हणाली आई आता आम्हाला जायचय आणि तू त्यांना जाऊ  दिलस आई तू इथे नाहीस   बाकी माझ्याकडे सगळे आहे   घरापासून दूर जग खुप वेगले आहे...   

मग न जाने का , नजर माझीच लागली

मी म्हंटल "अगं मी काहीही करेन तुझ्यासाठी  तुला हसतं पाहण्यासाठी,तुझी आस्व पुसण्यासाठी तू फक्त होय म्हण ग,जीव तुझ्यातच गुंतलाय सारा " तिनेही लाजत म्हंटल "हो राजा मी तुझीच आहे रे, माझ्याही श्वासाला गरज तुझीच आहे रे" मग कसं कोण जाने,ती माझ्या मिठीत विरून गेली, विर्घळूनच गेली, अगदी माझ्याही नकळत!! आता मी मी राहिलो नव्हतो,न ती ती उरली होती  दोघानाही आता ओढ लग्नाची लागली होती.. मग न जाने का , नजर माझीच लागली ..... मी तिला अचानक माझ्या लग्नाची खबर सांगितली  अन थोड्याच वेळात रूम तिची गाठली, पत्रीकेसोबत त्या भाबडीने हात तिचा कापला होता .. मी जाण्यापूर्वी श्वास कधीच सोडला होता... पुन्हा येऊन पाहून जा ग पत्रिका आहे आपल्याच लग्नाची .. सोंग केलं होतं ग मी सारं... फक्त तुला जळवण्यासाठी .. ग प्रिये थोडं जळवण्यासाठी.. आज तिच्या प्रेतासोबत माझंही प्रेत जळतंय... जीव सोडला आहे....तरीही काळीज रडतंय... ....... ♡   Bhushan   ♡

कविता सुचली पाहिजे..

कविता बर्फाच्या गोळ्यासारखी जमली पाहिजे मधाच्या नादात, माशीसारखी रमली पाहिजे तिला कवितेवर फारच राग, म्हणे "कविता मी आल्यावर थांबली पाहिजे" कविता अशी देवाच्या स्वर्गात सुरू, आणि तिच्या कपाळावरच्या टिकलीवर संपली पाहिजे त्यांना कविता काय माहित जे म्हणतात ती सुर-तालात नीट बसली पाहिजे कविता माझ्यासारखी संतापून मग तिच्यासारखी हळूच लाजली पाहिजे मेंदू कडे विचारांचा धक्का पोचवून मग कविता हृदयाला पण लागली पाहिजे समाजावर रडली नाही तर निदान कविता कविच्या लाचारीवर हसली पाहिजे ती रुसली की, तिला मनवण्यासाठी एखादीतरी कविता पटकन सुचली पाहिजे... 

फक्त माझ्या आईसाठी..

फक्त माझ्या आईसाठी... ही कविता फक्त माझ्या आईसाठी अग कस सहन केल असशील मल नऊ महिने घेउन जगण?? तुला रात्रभर जराही झोपू न देता तुझ्या मांडीवर माझ ते रडण?? आई, आज मला तुझी खूप् आठवण येतेय कारण आज मी सपशेल हारलोय म्हणून परत तुझ्या त्या लढवय्या जीवनाची स्वत:ला आठवण करुन देतोय माझ्याकडे जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझच आहे... आत्मा आणि ईश्वर यांचा मेळ म्हणजे आई हे म्हणतात ते खरच आहे.... मला अजूनही आठवतय तू मला वीरांची गाथा सांगायचीस आता वाटतय खरोखर तोच तू वीर असायचीस आई तू माझी आजिबात काळजी करु नकोस आज पडलोय, उद्या उठीन तूझ्या गोष्टीतल्या त्या वीरासारखा आणि तू शिकवल्यासारखा फक्त लढीन तू म्हणायचीस आयुष्यात आधी लढायच असत आणि मग जिंकायच असत तू घडविलेला , तुझा हा वीर तुझी ही शिकवण वाया जाऊ देणार नाही....\

काहीच सुचेनासं होतं .............

*Life is messed up……!!!!! जे काही झालं …. त्यात मी पूर्ण पणे 100 % देऊन try केल…. काहीच नाही समजत काय करायचं ते ….. ??? काय होणार आहे ते ??? … * *डोळे बंद केले कि डोळ्यांसमोर ….. Future …. life …. आणि काय काय तसेच भरपूर प्रश्न येतात …. आणि झोप उडउन  टाकतात …… डोळे उघडे असताना …. present च्या विचाराने .. वैताग येतो… आणि त्यातच … past … तो देखील एवढा वाईट आहे …  नुसता विचार करून करून … काहीच सुचेनासं होतं ...*

यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा.....

१०० रुपयांची नोट भरपूर मोठी वाटते ना जेव्हा गरिबाला द्यायची असेल?,.......पण हॉटेल मध्ये बसल्यावर खूप कमी वाटतात ..... ३ मिनिटे देवाची आठवण काढायची झाली तर अवघड वाटते ,........पण ३ तासाचा बकवास सिनेमा बघायला सोपे जाते..... पूर्ण दिवस मेहनत केल्यावर संध्याकाळी जिम मध्ये जायला थकत नाही ..........पण आपल्या आईवडिलांचे पाय चेपून द्यायला कंटाळा येतो ...... ValentineDay ला २०० रुपयांचा फुलांचा गुच्छ घेऊन जाऊशकतो..............पण Mothers Day  ला १ रुपयाचा गुलाब आईसाठी नाही घेऊशकत./..... या मेल ला फोरवर्ड करायला खूप अवघड वाटते .........पण फालतू मेल फोरवर्ड करायला आपण आपले कर्तव्य समजतो ...... यावर थोडा विचार करा नाहीतर पुन्हा वाचा......  ..   ....  ..   ....

सर्वात श्रीमंत मुलगा

शाळेने पत्रक काढलं ,' यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे , तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा , ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीला मिळेल ! आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे , खरोखर पंचाईतच होती . ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की , अगदी एक विजार , एक सदरा असेल , तरी तो रोज धुऊन - वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात . गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं , तुमच्यात कोण गरीब ; तेही सर्वात गरीब म्हणून ?! मोठीच अडचण होती . तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले . वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ; पण लहान मुलांमधे अडचणीचं . शेवटी दोन - चार मुलांना हाताशी घेतलं , जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची . मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची . अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का ? आपल्या वर्गातला सर्वात गरीब .......?" क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले ," सर आपल्य...

अपूर्ण इच्छा

खूप इच्छा होती तुझ्या भावनेशी जुळण्याची शक्यता वाटली होती तुझ्या मनाला  पूर्णपणे मिळवण्याची देवाने मनात आणल असत तर हे नात सहज शक्य होत पण आपल्यासाठी  ते अशक्यातल अशक्य होत अखेर व्हायचं तेच घडलं एकमेकाची साथ सोडूनच जगण नशिबी आलं नियतीने एक फुल उमलण्या अगोदरच खुडलं तुझ्या मनाला स्पर्श केलेल्या भावना माझ्यापेक्षा भाग्यवान ठरल्या ह्या जन्मासाठी का होईना तुझ्या मनाशी जुळल्या ..

वेडीच आहेस...............

*"वेडीच आहेस "*. तुला कसं गं काहीच कळत नाही .... येथे जाळणारे बरेच आहेत पण कोणीच स्वतः जळत नाही !!! ज्याचा घाव न् घाव, ठेवला आहेस काळजात जपून त्याचा मात्र तुझ्यासाठी एकही अश्रू ढळत नाही ... वेडीच आहेस तुला कसं गं काहीच ठाऊक नाही ?? हे जगच पारध्यांचे येथे कोणीच भाऊक नाही !!!! समजून घ्यावी कोणी तुझ्या काळजातली कळ ? तुझ्या सारखी कोणाचीही वेदना घाऊक नाही !! वेडीच आहेस कशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाही अजूनही त्याच्या शिवाय दुसरी 'हसरत' म्हणून नाही ... एकांतात आसवांशी सारखं हितगूज करतेस म्हणे ! लोकांसमोर मात्र अश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !! वेडीच आहेस अजूनही स्वतःलाच दोष देते . रेशीम वेळी मनाला आठवांचा कोष देते !! साळसूद पणे निघून जाणार्याची अडचण असेन काही ..... असे समजून घटके पुरता मनास तोष देते !!! वेडीच आहेस आता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ ... आयुष्या वर ओढवून घेतलेले विरहाचे ढग बघ !!! तू ही सगळ्यांसारखी 'Practical' होऊ शकतेस ... एकदा तरी तुझ्यामधली आजमावून रग बघ !!! एकदा तरी तुझ्यामधली आजमावून रग बघ !!!  

“कधी ओंजळीत, मी कधी पानांवरती

“कधी ओंजळीत, मी कधी पानांवरती कधी संथ मी, कधी मी लाटांवरती कधी डॉळ्यांतुनी मी कधी श्वासातुनी झरतो, ओघळतो मी गालांवरती”मी प्रश्न मी मीच उत्तर……………. कधी माझ्यासाठी मीच प्रश्न, कधी माझ्यासाठी मीच उत्तर कधी मी प्रश्न, कधी मी उत्तर किती प्रश्न मी कितीसा उत्तर? कधी चुकवले होते मीच मला, कधी शिकविले होते मीच मला कधी प्रश्नासाठी, त्या प्रश्नापोटी कधी बदलले होते मीच मला कधी मी माझ्यातच सापडलो, कधी मी माझ्यातच अवघडलो कधी उत्तरात इथे मी बडबडलो, कधी मी प्रश्नाआधीच गडबडलो कधी देतो मी, कधी मागतो कधी विचारतो, कधी सांगंतो कधी शोधतो मी कधी लपवतो कधी मी सुत्रांसकटच हरवतो कधी उगाच मी इथे थांबतो ओळी-ओळीत इथे मी लांबतो पान मागचे मी उलटुन घेतो अन, तिथं स्वतःलाच मी पाहतो चुकतो कधी मी कधी बरोबर कधी खोटं-खोटं कधी खरोखर लेखणीतुनी मी खोल मनाच्या कधी थेंब-थेंब कधी येतो झरझर मी माझे अक्षर मी सुत्र माझे मी शब्द माझा हे मित्र माझे आरंभ मीच मी अंत माझा इथं प्रयोग मी, मीच पात्र माझे

असं प्रेम करावं.......

असं प्रेम करावं........ थोडं रुसावं थोडं हसावं, असं प्रेम करावं गुपचुप फोन वर बोलावं, कोणाची नजर  पडताच पटकन "अरे"च "अगं"   करावं असं प्रेम करावं.... जग पुढे चाललं असलं तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं, फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही, आपण मात्र पत्र लिहुन मांडावं, असं प्रेम करावं.... कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं मग आपणच जाऊन sorry म्हणावं, असं प्रेम करावं.... वर वर त्याच्या  भोळसट पनाची, खूप चेष्टा करावी, पण तरीही तो  तुम्हाला किती आवडतो , हे जरूर सांगावं, असं प्रेम करावं.... प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं, पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं असं प्रेम करावं.... विरह येतील, संकट ओढवतील, प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील, पण आपण मात्र खंबीर रहावं, असं प्रेम करावं.... एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं, म्हणूनच जीवापाड जपावं, असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं .... त्यासाठी आयुष्यात एकदा तरी प्रेमात करावं ...!!

आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले

आता जगायचे असे माझे किती क्षण राहिले माझ्य धुळीचे शेवटी, येथे किती कण राहिले हृदयात विझला चंद्रमा नयनी न उरल्या तारका नाही म्हणायाला तुझे, हे आपुलेपण राहिले होता न साधा एव्हढा जो शब्द मे तुजला दिला एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहतो, मागे किती जण राहिले